कष्टप्रद दुःखाचे दुष्टचक्र : ‘अवकाळी पावसादरम्यानची गोष्ट’
Main Article Content
Abstract
‘अवकाळी पावसादरम्यानची गोष्ट’ ही आनंद विंगकर यांची पहिली कादंबरी महाराष्ट्रातील एका शेतकरी कुटुंबाचे विदारक वास्तव मांडते. सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हे कथानक, यशानाना नावाच्या कर्जबाजारी शेतकऱ्याभोवती फिरते, जो सततचा दुष्काळ, कर्जाचा ताण आणि वैयक्तिक अपयशामुळे आत्महत्या करतो. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबावर कोसळलेले अस्मानी संकट आणि समाजाचे बदलणारे चित्र कादंबरी चित्रित करते. आत्महत्येनंतर थोरली मुलगी उषा सर्व व्यक्तिगत भावनांचा त्याग करून लहान बहिणींना घेऊन नव्या निर्धाराने परिस्थितीशी लढायला सज्ज होते. ही कादंबरी कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या समस्या, ग्रामीण समाजजीवन, जात वास्तव आणि बदलत्या संबंधांचे चित्रण करते, ज्यामुळे ती शोषित शेतकरी समूहाचे प्रतिनिधित्व करते.
Article Details
Section

This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 4.0 International License.
How to Cite
References
‘अवकाळी पावसादरम्यानची गोष्ट ‘, आनंद विंगकर, लोकवाङ्मयगृह, मुंबई, २०११.