भारतीय भाषा आणि राष्ट्रीय एकात्मता

Main Article Content

संगीता नागापा गुरवानगोळ

Abstract

भारत हा ‘विविधतेत एकता’ दर्शवणारा देश आहे, जिथे भाषा ही अडथळा नसून सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्रीय अस्मितेचा मुख्य आधार आहे. प्रस्तुत लेख राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्यात भारतीय भाषांच्या, विशेषतः मराठी, हिंदी आणि कन्नड साहित्याच्या भूमिकेचा वेध घेतो. प्राचीन संत साहित्यापासून ते आधुनिक लेखनापर्यंत, साहित्याने प्रादेशिक सीमा ओलांडून विश्वबंधुत्व, सामाजिक समता आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश कसा दिला, याचे विश्लेषण यात केले आहे. भाषिक विविधता ही भारताची कमजोरी नसून ती लोकशाही मूल्ये दृढ करणारी शक्ती आहे. परस्पर संवाद, सहिष्णुता आणि साहित्याचा अनुवाद हे घटक भारताची सांस्कृतिक व राष्ट्रीय एकता अबाधित ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन या लेखात केले आहे.

Article Details

Section

Research Articles

Author Biography

संगीता नागापा गुरवानगोळ

मराठी विभाग, के. एल. ई. संस्थेचे, जी. आय. बागेवाडी, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, निपाणी.

References

आधुनिक मराठी साहित्य आणि राष्ट्रीय एकात्मता

https://marathi.webdunia.com

अनंतमूर्ती यांच्या कथा, उमा कुलकर्णी, मौज प्रकाशन गृह

Vidyawarta Interdisciplinary Journal / SSN 2319-9318 / UGC

प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास, ल.रा. नसिराबादकर, फडके प्रकाशन.